शुक्रवार, १९ डिसेंबर, २०१४

रोगांची महासत्ता जगावर

रोगांची महासत्ता जगावर
आगामी काळात भारत देश जगावर महासत्ता गाजवणार ह्या विषयी जोरदार चर्चा सगळीकडे रंगत असतात पण त्या चर्चा कितपत योग्य आहेत ते माहित नाही , पण रोज गाय,कुत्रा,कावळा,मासा,मुंग्या आणि भुकेल्याला घास देऊन समाजाचा आणि निसर्ग पर्यावरणाचा समतोल साधा असे सांगणारी भारतीय संस्कृती सोडल्यामुळे आणि आंधळेपणाने पाश्चीमात्त्य संस्कृतीच्या मागे लागून झालेले दुष्परिणाम आता अगदी खूप वाढलेले दिसू लागले आहेत, आजुबाजुला मित्र नातेवाईकात मधुमेह,हृदय विकार, कॅन्सर सारखे आजाराचे वाढलेले प्रमाण सर्वत्र ऐकु येऊ लागले आहे. आज काय मामाला कॅन्सर झाला , उद्या काय तर मित्राच्या वडिलांना कॅन्सर झाला असे वरचेवर ऐकू येऊ लागले आहे. हे सुदृढ समाजाचे लक्षण नाही. त्यामुळे भारत महासत्ता बनणे वगैरे गोष्टीची चर्चा सोडून विश्वाचा, समाजाचा आणि निसर्ग पर्यावरणाचा समतोल साधणे ह्यातच संपूर्ण जगाचे, प्राणी सृष्टीचे आणि मानवाचे कल्याण आहे हे सुशिक्षित समाजाने समजून घेऊन आपल्या ऋषी मुनींनी गौरवलेल्या भारतीय संस्कृतीला आपले म्हणून ती स्वतः जगून टिकविणे आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्द करणे ह्याकडे संपूर्ण भारतीय जनतेने लक्ष केंद्रीत करावे. कोणाची महासत्ता जगावर राज्य करणार हा प्रश्न सोडून द्या पण सध्या तरी रोगांची,प्रदूषणाची महासत्ता संपूर्ण विश्वावर आहे हे सुशिक्षीत समाजाला समजत नाही का ?
सुरेश पित्रे , चेंदणी,ठाणे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा