शनिवार, २० डिसेंबर, २०१४

SANT TULSIDAS MAHARAJ - MARATHI ARTICLE - SANT VICHAR DHAN

संत विचार धन 
काही वेळा असे होते कि , रोगी पथ्य पाळतो , वेळेवर औषध घेतो पण तरीही
गुण येत नाही , तेव्हा लोकं म्हणतात कि काय भोग संपत नाहीत. काही जण 
मंत्र , स्तोत्र म्हणून पाहतात पण त्यानेही गुण येत नाही , तेव्हा लोकं म्हणतात 
मंत्राने काही बरे वाटत नाही , तर त्यात दोष मंत्राचा नाही. तर मग दोष काय ?
तर प्रज्ञापराध . म्हणजे काय ? तर बळाचा (बाहु बळ , बुद्धी बळ, पैशाचे बळ इत्त्यादी 
सात प्रकारच्या बळांचा) वापर करून तुम्ही गरिबाला (गरीब कोण तर जो वरील 
प्रकारे सात प्रकारचे बळ नसलेला ) त्याला तुम्ही जर त्रास दिला , छळ केला  
म्हणजे कचेरीत जो अधिकारी आहे त्याने शिपायाला / क्लार्कला विनाकारण 
त्रास दिला किंवा सासूने सुनेला / सुनेने सासूला विनाकारण त्रास दिला 
आणि त्या गरिबाला अबल असल्यामुळे त्या त्रासाला विरोध करता नाही आला 
आणि तो त्रास तसाच मनात राहून त्याचा आत्मा तडफडला तर तेव्हा 
त्याला तुम्हाला तोंडाने विरोध करता नाही आला तरी मनातल्या मनात 
तडफडत शाप दिला तर त्या शापामुळे येणाऱ्या भोगांना / आजाराला औषधाने , 
मंत्राने कशानेच गुण येत नाही , तेव्हा आपल्याकडून प्रज्ञापराध होणार नाही 
ह्याची काळजी घेतली पाहिजे, ह्यावर आधारित परमपूज्य स्वामी सवितानंद
ह्यांनी एक गोष्ट सांगितली कि त्यांच्याकडे असेच तीन भाऊ आले होते 
त्यांना क्षयाची बाधा झाली होती आणि कशानेच गुण येत नव्हता , तेव्हा 
स्वामिनी त्यांना विचारले कि तुमची आई आजारी होती आणि तुम्ही श्रीमंत 
असून सुद्धा तिच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले का तर म्हणे म्हातारी मरणारच आहे 
कशाला खर्च करा ? पुढे ती आई वारली. आणि आता ह्या तिघांचे ह्यांचे म्हातारपण आले 
तेव्हा ह्यानाही क्षयानेच ग्रासले आणि आता कशानेच गुण येत नाही , पुढे ते तीघेही ह्या 
प्रज्ञा अपराधामुळे शेवटी मरण पावले , अर्थात हे भोग ह्या जन्मीचेच असतील असे नाही 
गेल्या जन्मीच्या प्रज्ञापराधाचेहि असू शकतात. स्वामीनी त्याला अनुसरून 
एक चांगला दोहा सांगितला 
“तुलसी हाय गरीब की , कबहू न निष्फल जाये ।
  मरे बैल के चाम सुं ,लोहा  भसम हो जाये ।
अर्थ असा कि गरीबाची हाय लागली कि तो मेल्यावर सुद्धा संपत नाही 
ती भोग भोगूनच संपवावी लागते , जसे कि बैलाला मारून त्याचे चामडे 
काढताना त्याने दिलेले शाप मेल्या नंतर त्याच्या चामड्यातूनही
लागतात आणि तो चामड्याचा भाता जेव्हा चालतो तेव्हा अत्त्यंत कठीण असे 
लोखंडहि विरघळते तिथे माणसाची / रोगांची काय कथा ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा