शुक्रवार, ८ जुलै, २०१६
सोमवार, २२ डिसेंबर, २०१४
21/9/2009 - RECESSION TIME रिसेशन !
21/9/2009 - RECESSION TIME
रिसेशन ! रिसेशन ! रिसेशन !
झाली किती कठीण परिस्थिती
मोठी ऑर्डर नाही मिळत हाती
कर्मचारी सर्व चर्चा करती
आता कंपनीचे कसे होणार ? II१II
प्रतिस्पर्धी आमचे तगडे गडी
आपणही तोडीस तोड मारू मुसंडी
म्हणती असे कंपनीचे एमडी
बनुया वर्ल्ड मार्केट लीडर II२II
कोणी म्हणे आहे आता रिसेशन
पगारास लावले २०% व्हेरीएशन
एचआरचे स्वप्न नवीन ऑर्गनायझेशन
चालल्या मोठमोठ्या घडामोडी II३II
जगामधे वाहती रिसेशनचे वारे
कंपनीमधे वर्ल्डक्लास कंपनीचे वारे
कर्मचाऱ्यांनो काळजी नका करू रे
म्हणती सदैव कंपनीचे मालक II४II
कोणांस वाटतो खेळ हा फसवा
नका करू उगाच हो गवगवा
नका पसरवू खोट्या अफवा
दटावती कंपनीचे मालक II५II
जगात चालला खेळ अर्थकारण
परिणाम तयाचा राजकारण
कोणाचा जातो त्यात जीव अकारण
म्हणती सृष्टीचाच हा नियम II६II
रीसेशनचे वारे सर्वत्र वाहती
कोणी खोटे खोटे रडून घेती
कर्मचाऱ्यांचा पगार कापती
नेमला एच आर मध्यस्थी II७II
जुन्या कर्मचाऱ्यांना मारुनी लाथ
नवीन कर्मचाऱ्यांची घ्यावी साथ
आजच्या कंपन्यांचा पडला प्रघात
वापरा आणि काढून टाका II८II
एच आर मधाळ गोड बोलतो
गोड बोलुनी खेळ खेळतो
स्वतःचे टार्गेट पूर्ण करतो
दुसरा जाऊदेSना खड्ड्यात II९II
जुन्या कर्मचाऱ्यांचा पगार कापतो
नवीन येणाऱ्यांस खिरापत वाटतो
गोड बोलुनी खोटे रडून दाखवितो
एच आर पक्का एक नंबर नाटकी II१०II
कोणांस कधी टर्मिनेट करती
कोणांस नवीन कंत्राट पत्र देती
जुनाच मॅनेजर नव्याने घेती
पदोन्नतीचा खेळ खेळून II११II
कोणी दुसरा छान जॉब शोधतो
कोणी स्वतःच राजीनामा देतो
कोणी जातो विदेशी, परदेशांत
स्वतःच्या करिअर प्रगतीसाठी II१२II
कोणांस रोकड देऊन घरी बसविती
कोणांस नुसतेच कामाविना बसविती
कोणाची बदली दुसरीकडे करती
चालली सारी मजा मजा ! सजा II१३II
कोणी भीतीने कामात राबत बसती
कोणी बॉसला शेंड्या लावून पळती
कोणी बॉसची चमचेगिरी करती
कोणी तोंडावर गोड,मागे शिव्या देती II१४II
कोणी शेअर बाजारात आहे म्हणतो
शेअरचा फुगा फुगून फुगून फुगतो
आणि एक दिवस ढुपकन फुटतो
सेन्सेक्स कोसळला म्हणतो II१४II
आह्मी कर्मचारी आणि कामगार
मॅनेजमेंटच्या सुरीची जाणतो धार
नाही राहणार कोणीही बेकार
मेहनती आणि कामसू आह्मी II१५II
कोणी म्हणे चुकीचे आपले कोटेशन
ऑर्डर नाही, खूप आहे कॉम्पीटिशन
कोणी म्हणे रिसेशन आहे रिसेशन
कोणी म्हणे कधी संपेल हे रिसेशन?II१६II
लेखक / कवी - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
OLD MARATHI HINDI BLACK AND WHITE TV PROGRAMMES , SERAILS 70s,80s
खाजगी केबल वाहिन्या येण्यापूर्वी दूरदर्शनचा बोलबाला होता , त्यावर आधारित कविता लिहिली आहे
ब्लॅक अँड व्हाइटचा जमाना होता I
मराठी, गुजराथी, हिंदी I तामिळ तसेच होते सिंधी I
सर्व भाषिकांना असायची संधी I फक्त दूरदर्शनवर II१II
चिमणराव आणि गुंड्याभाऊ I मैना आणि राघु काऊ I
मनोरंजनाचा होता खाऊ I सर्व प्रेक्षकांसाठी II२II
धिटुकल्या आणि आवडाबाई I किलबिल पहायची ताई I
करमचंद मालिका पहायची आई I तेव्हा दूरदर्शनवर II३II
जमाना होता ब्लॅक अँड व्हाइट I कार्यक्रम नव्हते हो वाईट I
सिनेमातील ढिशुम ढिशुम फाईट I दिसायची फक्त रविवारी II४II
कार्यक्रम होता फक्कड I सर्वांच्या आवडीचे होते नुक्कड I
गुरु-खोपडीची होती पकड I त्या हिंदी मालिकेवर II५II
फुल खिले है गुलशन गुलशन I अशोककुमार कधी राकेश रोशन I
नवीनच होते स्लो मोशन I क्रिकेट चित्रीकरणात II६II
सर्कस मालिका होती छान I कलाकार होता शाहरुख खान I
आता झाला तो महान I हिंदी सिनेमाचा हिरो II७II
मालिकेमधे धमाल मस्ती I चाळ नावाची वाचाळ वस्ती I
खर्च नव्हता जास्ती I तेव्हा मनोरंजनासाठी II८II
नवीन गाण्यांचं चित्रगीत I जुन्या गाण्यांचं छायागीत I
बरीच वर्षं होती एकच रीत I तेव्हा दूरदर्शनची II९II
पुढील कार्यक्रमांची सुचना I साप्ताहिकी आठवते ना ?
''व्यत्यय'' चा पडदा आठवतो ना ? फक्त दूरदर्शनवर II१०II
हरवलेल्यांची शोकांतिका I आपण ह्यांना पाहिलात का ?
कसा पिकवायचा मका I पहा ‘आमची माती आमची माणसं’ II११II
मालिकांसाठी रांग लागायची I किती तरी दिवसांनी वेळ यायची I
मालिकेला संधी मिळायची I फक्त तेरा भागांसाठी II१२II
विनोदी कार्यक्रम गजरा I म्हणजे हास्याचा फवारा I
मराठी कलाकारांचा नखरा I फक्त दूरदर्शनवर II१३II
रविवारी सकाळी शुकशुकाट का ? कारण होते रामायण मालिका I
हनुमान जाळत होता लंका I रावण राक्षसाची II१४II
उजाडायची रविवार सकाळ I मालिका महाभारत विक्रम वेताळ I
हिंदी सिनेमाने सरायची संध्याकाळ I दूरदर्शनवर II१५II
चोराला पकडून पोलिस धन्य I मालिका एक शून्य शून्य I
मराठी मालिका सर्वमान्य I दूरदर्शन प्रेक्षकांची II१६II
ब्लॅक अँड व्हाइटचा जमाना होता I खाजगी वाहिन्यांचा सामना नव्हता I
जमाना तो जुना होता I गेला काळाच्या पडद्याआड II१७II
लेखक / कवी - सुरेश पित्रे.पत्ता - "वैद्य सदन",
पहिला मजला,राघोबा शंकर रोड,
मराठी, गुजराथी, हिंदी I तामिळ तसेच होते सिंधी I
सर्व भाषिकांना असायची संधी I फक्त दूरदर्शनवर II१II
चिमणराव आणि गुंड्याभाऊ I मैना आणि राघु काऊ I
मनोरंजनाचा होता खाऊ I सर्व प्रेक्षकांसाठी II२II
धिटुकल्या आणि आवडाबाई I किलबिल पहायची ताई I
करमचंद मालिका पहायची आई I तेव्हा दूरदर्शनवर II३II
जमाना होता ब्लॅक अँड व्हाइट I कार्यक्रम नव्हते हो वाईट I
सिनेमातील ढिशुम ढिशुम फाईट I दिसायची फक्त रविवारी II४II
कार्यक्रम होता फक्कड I सर्वांच्या आवडीचे होते नुक्कड I
गुरु-खोपडीची होती पकड I त्या हिंदी मालिकेवर II५II
फुल खिले है गुलशन गुलशन I अशोककुमार कधी राकेश रोशन I
नवीनच होते स्लो मोशन I क्रिकेट चित्रीकरणात II६II
सर्कस मालिका होती छान I कलाकार होता शाहरुख खान I
आता झाला तो महान I हिंदी सिनेमाचा हिरो II७II
मालिकेमधे धमाल मस्ती I चाळ नावाची वाचाळ वस्ती I
खर्च नव्हता जास्ती I तेव्हा मनोरंजनासाठी II८II
नवीन गाण्यांचं चित्रगीत I जुन्या गाण्यांचं छायागीत I
बरीच वर्षं होती एकच रीत I तेव्हा दूरदर्शनची II९II
पुढील कार्यक्रमांची सुचना I साप्ताहिकी आठवते ना ?
''व्यत्यय'' चा पडदा आठवतो ना ? फक्त दूरदर्शनवर II१०II
हरवलेल्यांची शोकांतिका I आपण ह्यांना पाहिलात का ?
कसा पिकवायचा मका I पहा ‘आमची माती आमची माणसं’ II११II
मालिकांसाठी रांग लागायची I किती तरी दिवसांनी वेळ यायची I
मालिकेला संधी मिळायची I फक्त तेरा भागांसाठी II१२II
विनोदी कार्यक्रम गजरा I म्हणजे हास्याचा फवारा I
मराठी कलाकारांचा नखरा I फक्त दूरदर्शनवर II१३II
रविवारी सकाळी शुकशुकाट का ? कारण होते रामायण मालिका I
हनुमान जाळत होता लंका I रावण राक्षसाची II१४II
उजाडायची रविवार सकाळ I मालिका महाभारत विक्रम वेताळ I
हिंदी सिनेमाने सरायची संध्याकाळ I दूरदर्शनवर II१५II
चोराला पकडून पोलिस धन्य I मालिका एक शून्य शून्य I
मराठी मालिका सर्वमान्य I दूरदर्शन प्रेक्षकांची II१६II
ब्लॅक अँड व्हाइटचा जमाना होता I खाजगी वाहिन्यांचा सामना नव्हता I
जमाना तो जुना होता I गेला काळाच्या पडद्याआड II१७II
लेखक / कवी - सुरेश पित्रे.पत्ता - "वैद्य सदन",
पहिला
चेंदणी,ठाणे (पश्चिम), पिन कोड क्र. – ४००६०१,
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
शनिवार, २० डिसेंबर, २०१४
PURANOKTA SHRI LAXMI LAKSHMI SUKTA
नमस्कार
सूक्त म्हटले कि ती वेदातीलच असतात असे आहे ना ?
पण मी काल गजानन बुक डेपो दुकानात एका पुस्तकात पुराणोक्त श्री / लक्ष्मी सुक्त पाहिले
ते कुठे महाजालावर आपण पाहिले तर मला पाठवाल का ?
ते प्रकाशन पुण्याचे आहे ,
धन्यवाद,
सुरेश पित्रे
SANT TULSIDAS MAHARAJ - MARATHI ARTICLE - SANT VICHAR DHAN
संत विचार धन
काही वेळा असे होते कि , रोगी पथ्य पाळतो , वेळेवर औषध घेतो पण तरीही
गुण येत नाही , तेव्हा लोकं म्हणतात कि काय भोग संपत नाहीत. काही जण
मंत्र , स्तोत्र म्हणून पाहतात पण त्यानेही गुण येत नाही , तेव्हा लोकं म्हणतात
मंत्राने काही बरे वाटत नाही , तर त्यात दोष मंत्राचा नाही. तर मग दोष काय ?
तर प्रज्ञापराध . म्हणजे काय ? तर बळाचा (बाहु बळ , बुद्धी बळ, पैशाचे बळ इत्त्यादी
सात प्रकारच्या बळांचा) वापर करून तुम्ही गरिबाला (गरीब कोण तर जो वरील
प्रकारे सात प्रकारचे बळ नसलेला ) त्याला तुम्ही जर त्रास दिला , छळ केला
म्हणजे कचेरीत जो अधिकारी आहे त्याने शिपायाला / क्लार्कला विनाकारण
त्रास दिला किंवा सासूने सुनेला / सुनेने सासूला विनाकारण त्रास दिला
आणि त्या गरिबाला अबल असल्यामुळे त्या त्रासाला विरोध करता नाही आला
आणि तो त्रास तसाच मनात राहून त्याचा आत्मा तडफडला तर तेव्हा
त्याला तुम्हाला तोंडाने विरोध करता नाही आला तरी मनातल्या मनात
तडफडत शाप दिला तर त्या शापामुळे येणाऱ्या भोगांना / आजाराला औषधाने ,
मंत्राने कशानेच गुण येत नाही , तेव्हा आपल्याकडून प्रज्ञापराध होणार नाही
ह्याची काळजी घेतली पाहिजे, ह्यावर आधारित परमपूज्य स्वामी सवितानंद
ह्यांनी एक गोष्ट सांगितली कि त्यांच्याकडे असेच तीन भाऊ आले होते
त्यांना क्षयाची बाधा झाली होती आणि कशानेच गुण येत नव्हता , तेव्हा
स्वामिनी त्यांना विचारले कि तुमची आई आजारी होती आणि तुम्ही श्रीमंत
असून सुद्धा तिच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले का तर म्हणे म्हातारी मरणारच आहे
कशाला खर्च करा ? पुढे ती आई वारली. आणि आता ह्या तिघांचे ह्यांचे म्हातारपण आले
तेव्हा ह्यानाही क्षयानेच ग्रासले आणि आता कशानेच गुण येत नाही , पुढे ते तीघेही ह्या
प्रज्ञा अपराधामुळे शेवटी मरण पावले , अर्थात हे भोग ह्या जन्मीचेच असतील असे नाही
गेल्या जन्मीच्या प्रज्ञापराधाचेहि असू शकतात. स्वामीनी त्याला अनुसरून
एक चांगला दोहा सांगितला
“तुलसी हाय गरीब की , कबहू न निष्फल जाये ।
मरे बैल के चाम सुं ,लोहा भसम हो जाये ।
अर्थ असा कि गरीबाची हाय लागली कि तो मेल्यावर सुद्धा संपत नाही
ती भोग भोगूनच संपवावी लागते , जसे कि बैलाला मारून त्याचे चामडे
काढताना त्याने दिलेले शाप मेल्या नंतर त्याच्या चामड्यातूनही
लागतात आणि तो चामड्याचा भाता जेव्हा चालतो तेव्हा अत्त्यंत कठीण असे
लोखंडहि विरघळते तिथे माणसाची / रोगांची काय कथा ?
काही वेळा असे होते कि , रोगी पथ्य पाळतो , वेळेवर औषध घेतो पण तरीही
गुण येत नाही , तेव्हा लोकं म्हणतात कि काय भोग संपत नाहीत. काही जण
मंत्र , स्तोत्र म्हणून पाहतात पण त्यानेही गुण येत नाही , तेव्हा लोकं म्हणतात
मंत्राने काही बरे वाटत नाही , तर त्यात दोष मंत्राचा नाही. तर मग दोष काय ?
तर प्रज्ञापराध . म्हणजे काय ? तर बळाचा (बाहु बळ , बुद्धी बळ, पैशाचे बळ इत्त्यादी
सात प्रकारच्या बळांचा) वापर करून तुम्ही गरिबाला (गरीब कोण तर जो वरील
प्रकारे सात प्रकारचे बळ नसलेला ) त्याला तुम्ही जर त्रास दिला , छळ केला
म्हणजे कचेरीत जो अधिकारी आहे त्याने शिपायाला / क्लार्कला विनाकारण
त्रास दिला किंवा सासूने सुनेला / सुनेने सासूला विनाकारण त्रास दिला
आणि त्या गरिबाला अबल असल्यामुळे त्या त्रासाला विरोध करता नाही आला
आणि तो त्रास तसाच मनात राहून त्याचा आत्मा तडफडला तर तेव्हा
त्याला तुम्हाला तोंडाने विरोध करता नाही आला तरी मनातल्या मनात
तडफडत शाप दिला तर त्या शापामुळे येणाऱ्या भोगांना / आजाराला औषधाने ,
मंत्राने कशानेच गुण येत नाही , तेव्हा आपल्याकडून प्रज्ञापराध होणार नाही
ह्याची काळजी घेतली पाहिजे, ह्यावर आधारित परमपूज्य स्वामी सवितानंद
ह्यांनी एक गोष्ट सांगितली कि त्यांच्याकडे असेच तीन भाऊ आले होते
त्यांना क्षयाची बाधा झाली होती आणि कशानेच गुण येत नव्हता , तेव्हा
स्वामिनी त्यांना विचारले कि तुमची आई आजारी होती आणि तुम्ही श्रीमंत
असून सुद्धा तिच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले का तर म्हणे म्हातारी मरणारच आहे
कशाला खर्च करा ? पुढे ती आई वारली. आणि आता ह्या तिघांचे ह्यांचे म्हातारपण आले
तेव्हा ह्यानाही क्षयानेच ग्रासले आणि आता कशानेच गुण येत नाही , पुढे ते तीघेही ह्या
प्रज्ञा अपराधामुळे शेवटी मरण पावले , अर्थात हे भोग ह्या जन्मीचेच असतील असे नाही
गेल्या जन्मीच्या प्रज्ञापराधाचेहि असू शकतात. स्वामीनी त्याला अनुसरून
एक चांगला दोहा सांगितला
“तुलसी हाय गरीब की , कबहू न निष्फल जाये ।
मरे बैल के चाम सुं ,लोहा भसम हो जाये ।
अर्थ असा कि गरीबाची हाय लागली कि तो मेल्यावर सुद्धा संपत नाही
ती भोग भोगूनच संपवावी लागते , जसे कि बैलाला मारून त्याचे चामडे
काढताना त्याने दिलेले शाप मेल्या नंतर त्याच्या चामड्यातूनही
लागतात आणि तो चामड्याचा भाता जेव्हा चालतो तेव्हा अत्त्यंत कठीण असे
लोखंडहि विरघळते तिथे माणसाची / रोगांची काय कथा ?
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
// अभंग गो वंशाचे // अभंग गाईचे // गोमाता सांभाळा / प्रत्येक घरांत / गावांत गोशाळा / हवी हवी // गाय हे जगाचे / आहे हो दैवत / संस्कार ...


